वाघ्याच्या स‌माधीची गोष्ट


छत्रपती शिवाजी महाराजांचा कृष्णा घोडी आणि वाघ्या कुत्र्यावर फार जीव होता. ही दोन्ही जीवाला जीव देणारी इमानी जनावरं. त्यातही वाघ्याच्या स्वामीनिष्ठेची कथा काय वर्णावी! महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर दुःखाने वेड्यापिश्‍या झालेल्या वाघ्याने राजांच्या चितेवर झेप घेतली आणि आपलं जीवन संपवलं. मराठ्यांच्या इतिहासात या मुक्‍या जनावराची स्वामिनिष्ठा सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. आजही धन्यावरील इमानाचा, श्रद्धेचा दाखला देताना वाघ्या कुत्र्याचं उदाहरण दिलं जातं. धन्य तो वाघ्या! (यासंदर्भातील एक बातमी आहे. जरूर पाहा - http://dogsinthenews.com/issues/0207/articles/020705b.htm)

पण ही वाघ्याची कथा खरोखरच खरी आहे? खरेच असा कुत्रा महाराजांकडे होता? त्याने खरेच महाराजांच्या चितेवर झेप घेऊन प्राणार्पण केलं? आणि हे जर खरं नसेल, तर मग रायगडावर दाखविली जाते ती समाधी कोणत्या कुत्र्याची आहे? या सवालांचे जवाब मोठे विस्मयकारक आहेत. वाघ्या, त्याचं प्राणार्पण आणि त्याचं स्मारक ही सगळीच एक मिथ आहे. महाराजांच्या अंतकाळच्या वर्णनात ही गोष्ट नाही. या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. शिवकालीन, शिवपूर्व वा शिवोत्तरकालीन कागदपत्रांत कधीही, कुठेही, कोणत्याही कुत्र्याने आपल्या धन्याच्या मृतदेहाबरोबर स्वतःला जाळून घेतल्याचा उल्लेख नाही.

ही कथा आली कोठून? तर कविवर्य राम गणेश गडकरी यांच्या कविकल्पनेतून ही अचाट कहाणी निर्माण झाली. तीही केव्हा, तर राजांच्या निर्वाणानंतर दोन-अडीचशे वर्षांनी. गंमत म्हणजे कुत्र्याच्या समाधीवर जो मजकूर आहे, त्यातच ही कथा गडकऱ्यांच्या "राजसंन्यास' या नाटकावरून घेतली असल्याचा उल्लेख "संदर्भ' म्हणून केलेला आहे.

आता असं जर असेल, तर मग कुत्र्याचे स्मारक तिथं आलं कुठून? याचीही एक (सत्य)कथा आहे. 1918 मध्ये इंग्रजांनी रायगड जिंकला. त्यावेळी त्यांच्या तोफांच्या भडिमाराने गडावरील सर्व इमारती जमीनदोस्त झाल्या. गडाची वाताहत झाली. त्याच वर्षी पेशवाई बुडाली आणि मराठी साम्राज्याचा हा मणिहार, रायगड विस्मृतीच्या काळोखात बुडाला तो पुढील तब्बल 67 वर्षे. 1885 साली इंग्रज गव्हर्नरने रायगडाला प्रथम भेट दिली. त्यावेळी राजांच्या समाधीची दुरवस्था पाहून तो इंग्रज अधिकारी कळवळला. म्हणाला, ""अरे, तुमचा राजा केवढा थोर होता. आणि त्याच्या समाधीची ही अवस्था?'' त्याने समाधीच्या तेलवातीसाठी पाच रुपये काढून दिले. त्यानंतर दरवर्षीच पाच रुपये अनुदान त्याकामी मंजूर करण्यात आलं.

ही गोष्ट लोकमान्य टिळकांच्या कानावर गेली. त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं. त्यासंदर्भात 1896 मध्ये एक सर्वपक्षीय सभा घेतली. पण पुढं ते काम थंडावलं. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा स्मारक समितीने उचल खाल्ली. स्मारकासाठी निधी जमवायला काही मंडळी इंदूरला होळकरांकडे गेली. पण शिवस्मारकाच्या कामासाठी पैसे देणं हे इंग्रज स्वामींना आवडणार नाही या भयाने हे संस्थानिक स्मारक समितीच्या सभासदांची भेट घेण्याचं टाळू लागले. भेट टाळायची, तर त्यासाठी कारण काय; तर "महाराज सुतकात आहेत'. सुतक कसलं, तर महाराणीसाहेबांचे लाडके कुत्रे साहेब मेले होते त्याचे! समितीच्या सभासदांना तोवर महाराजांची नेमकी काय अडचण आहे हे बरोबर लक्षात आलं होतं. तेव्हा त्यांनी त्यावर एक अफलातून तोडगा सुचविला, की महाराजांनी त्यांच्या लाडक्‍या कुत्र्याच्या स्मारकानिमित्त देणगी द्यावी आणि त्या देणगीचा काही अंश खर्चून समितीने त्या कुत्र्याचा पुतळा उभारावा.

त्यानुसार त्या पैशातील काही भाग खर्चून रायगडावर कुत्र्याचा पुतळा उभारण्यात आला. महाराजांची समाधी म्हणून 1926पूर्वी जो अष्टकोनी चबुतरा दाखविला जातो, ज्यावर नंतर मेघडंबरी बांधली, त्या चबुतऱ्याजवळ जो चौकोनी चौथरा दुर्लक्षिलेल्या अवस्थेत पडलेला होता, त्याची पुनर्रचना करून त्यावर हा होळकरांच्या कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला.

संदर्भ -
- "इतिहास - सत्य आणि आभास' - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 98
- "शिवरायांची समाधी आहे कोठे?' - रविवार सकाळ, 28 मे 1995

14 comments:

Anonymous said...

waah kya baat hai ..
hyaala mhanatata itihaas majeshir ahe

Nitin Mandre said...

this is not logical

santya said...

मला एकाच गोष्टीचे नवल वाटते जातीपातीच्या संदर्भात या महान आत्म्याला गोवून संभाजी ब्रिगेड काय साध्य करतेय ? शिवाजी महाराज काय एकाच जातीचे नेते होते ? त्यांच्या तरुणांसमोर असलेल्या आदर्शाला या तर्हेने धक्का लावणे म्हणजे शिवद्रोहच होय .

Anonymous said...

>>>> हा तर "मराठा व धनगर" समाजात वाद निर्माण करण्याचा घाट..!! <<<<<
वाघ्या कुत्रा या सर्व प्रकारात एक मजेशीर गोष्ट आहे... संभाजी बिर्गेड म्हणते राम गणेश गडकरी यांच्या कल्पनेतून ही अचाट कहाणी निर्माण झाली. तर काही जणांचे म्हणणे आहे कि.. वाघ्या शिवाजी महाराजांचा इमानदार कुत्रा होता.. महाराजांचं निधन झाल्यानंतर दुःखाने वेड्यापिश्‍या झालेल्या वाघ्याने राजांच्या चितेवर झेप घेतली आणि आपलं जीवन संपवलं......आणि कालांतराने होळकरांच्या देणगीतून त्याचे समारक बांधण्यात आले..
यात महत्वाचा मुद्दा हा कि "धनगर" समाजाचा या वादात जास्त संबध येत नाही .. कारण तो जर खरच महाराजांचा कुत्रा असेल तर "त्याची चिंता मराठ्यानाच असायली हवी" आणि हा कुत्रा गडकरी यांच्या कल्पनेतला असेल तर कुणीच वाद करायचे काम नाही...
माझ्या मते तरी हा समाजकंटाकांचा "मराठा व धनगर" यांच्यात वाद लावून देण्याचा प्रयतन आहे..

शिवजागर said...

हा घ्या वाघ्याचा शिवकालीन पुरावा!

... इ.स.१६७८ साली शिवाजी महाराजांनी दक्षीण दिग्विजय केला, परततांना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गढीला वेढा घातला होता. हे काम त्यांनी सखोजी गायकवाड या आपल्या सरदारावर सोपवले होते. बेलव
डीचा ठाणेदार येसाजी प्रभु देसाई मारला गेला. तथापि त्याची पत्नी मल्लाबाई हिने लढाई सुरुच ठेवली. तिने पुढे शिवरायांसोबत तह केला. शिवरायांनी तिचे राज्य तिला परत दिल
े आणि तिला सावित्रीबाई या किताबाने गौरवले. शिवरायांच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण कायम स्वरुपी कोरून ठेवण्यासाठी सावित्रीबाईने अनेक गावांच्या दरवाज्यांत व मंदिरांसमोर शिवरायांची पाषाणशिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प धारवाडच्या उत्तरेस असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षीनाभिमुख देवळाच्या पस्चिमेस असून त्याची उंची ३ फुट व रुंदी अडीच फुट आहे. शिल्पाचे दोन भाग असून खालच्या भागात शिवरायांनी मांडीवर बसवले आहे. शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार असलेली शिवरायांची प्रतिमा आहे. या शिल्पात शिवरायांसोबत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे. हे शिल्प शिवरायांच्याच हयातीत बनवले असल्याने शिवरायांच्या जीवनात कुत्रानव्हता हे म्हनने निराधार ठरते. एवढेच नव्हे तर शिवरायांच्या कुत्र्याची महती त्यांच्या हयातीतच कर्नाटकापर्यंत पोहोचली होती हे यावरून सिद्ध होते.

२. छत्रपती शिवरायांचे नातू शाहु महाराज (सातारा) यांच्या संगम माहुली येथील त्यांच्या खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे आणि ती जवळपास शिवरायांच्या वाघ्या सारखीच आहे. आणि हे स्मारक शिवरायांच्या निधनानंतरच सुमारे ४०-ते ५० वर्षांनी बनवले गेले होते. याचाच अर्थ असा होतो कि तत्कालीन सुस्थीतीत असलेल्या वाघ्या स्मारकाचीच प्रेरणा या स्मारकामागे असावी. खंड्याने एकदा शाहु महाराजांचे प्राण वाचवले होते याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांत आहे. यावरुन असे अनुमान निघते कि रायगडावरील वाघ्याचे स्मारक हे शाहु महाराजांच्या खंड्याचे स्मारक बनण्याची प्रेरणा ठरले आणि कालौघात नश्ट झालेल्या वाघ्याचे स्मारक बनायला शाहूंचा खंड्याचे स्मारक प्रेरणादायी ठरले. याचाच दुसरा अर्थ असा कि कुत्रयाचे स्थान शिवेतिहासात जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्यांच्याही वंशजांत होते.

याचाच अर्थ असा आहे कि प्रस्तूत वाद हा शिवरायांना, होळकरांना आणि तमाम मराठी मानसांना फसवण्याचा आणि आपले पोट जाळण्याचा धंदा आहे. वाघ्या इतिहासात होता. शाहू महाराजांचा खंड्याही इतिहासात होता. वाघ्या आणि खंड्या हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचीच रुपे आहेत. कर्नाटकातील शिल्प तर शिवरायांच्याच हयातीतील आहे...तेथे गडकरींचा संबंध कोठे येतो? गदकरींच्या"राजसन्यास"च्या ही आधी चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकातही (१९०५)वाघ्याचा उल्लेख यावा याला योगायोग म्हणता येत नाही. याचाच अर्थ असा निघतो कि वाघ्या हे शिवजीवनातील एक अविभाज्य असे पात्र होते आणि त्याचा यथोचित सन्मान राखला गेला पाहिजे.

Thanks to Sanjay Sonavani Sir

Balaji Sirsat Patil said...

चुकीचा इतिहास वाचून कोन्हाला दोष देन्या पेक्षा स्वत खरा इतिहास वाचा म्हणजे हरवलेली बुद्दी जागी येईल.
आणि एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा संभाजी ब्रिग्रेड आज ही 18 पगड़ जाती सोबत घेऊन चालते, आणि संभाजी ब्रिगेड त्यालाच दोष देते ज्या जातीने चुकीचे पाऊल उचलून खोटारडा इतिहास मांडला. बाकी जातींना का नाव बोट ठेवत नाही. उलट उपकार मानते त्या जातींचा त्याच जातींच्या मावळ्यांचा ज्यांनी है हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.

आता ठरवा तुम्हीच कोण आहे शिवभक्त आणि कोण आहे शिवद्रोही...?

जय शिवराय, जय शंभुराजे...

Balaji Sirsat Patil said...

मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्या चा उल्लेख का नाही आहे?

Unknown said...

वाघ्या प्रकरण काय आहे ? शिवाजी महाराज यांच्या पत्नी चा अवमान करणारे नराधम कोण आहेत ? होळकरांना बदनाम करणारे नराधम कोण आहेत ?
1 June 2011 at 13:21
दादू कोंडदेव चा पुतळा निघाल्या मुळे ब्राम्हणी इतिहासातील एक महत्वा चा पाया कोसळला. हळू हळू संपूर्ण ब्राम्हणी इतिहासा चा पाया कोसळल्या जात आहे. त्यातच संभाजी ब्रिगेड गेली पाच वर्ष वाघ्या कुत्र्या चा पुतळा जो छ.शिवराया च्या महाराणी आहेत त्यांच्या समाधी वर आहे तो हटवावा अशी न्याय मागणी करत आहे . काही दिवसा पूर्वी प्रवीणदादा गायकवाड यांनी जर तो वाघ्या कुत्र्या चा पुतळा काढला गेला नाही तर आम्ही तो फोडून टाकू अशी चेतावणी कोल्हापूर येथे दिली. मनुवादी या मुळे अस्वस्त झाले त्यानी जी मोठी हरामखोरी केली होती ती पण आता बाहेर निघाली आता आपली खैर नाही पण या वेळी ब्राम्हण समोर आले नाहीत कारण त्यांना माहित आहे की आपण खूप खोटी गोष्ट वाघ्या च्या माध्यमातून शिवरायाच्या इतिहासा वर थोपली आहे त्यामुळे आपल्याला त्याचे समर्थन करता येणार नाही त्या साठी त्यानी बहुजन समाजा मधील आपले दलाल लोक पुढे केले ते दलाल आता समोर आले आहेत.
ब्राम्हणा च्या दलाला चे म्हणणे काय आहे ते पाहू या ?

Unknown said...


त्या बामना च्या दलाला चे म्हणणे आहे की वाघ्या कुत्रा हा अस्मिते चा प्रश्न आहे तो आम्ही काढू देणार नाही . त्यांचे म्हणणे आहे की वाघ्या कुत्रा हा खंडोबा चा अवतार आहे आणि तो शिव इतिहासात होता त्याला पुरावा देता येणार नाही. सर्वच गोष्टी ला जसे पुरावे देता येत नाहीत त्यात वाघ्या कुत्रा हा एक आहे . वाघ्या कुत्रा हा स्वामी निष्ठे चे प्रतिक आहे त्याला आम्ही काढू देणार नाही . वाघ्या शिवाजी महाराज यांच्या पत्नी च्या समाधी वर जरी बांधला असेल त्याचे आम्हाला देणे घेणे नाही वाघ्या कुत्रा ही आमची अस्मिता आहे तो वाघ्या आम्ही काढू देणार नाही . जर तो संभाजी ब्रिगेड वाल्यांनी काढायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना फोडून काढू

आपण कुत्रा समर्थका ची भूमिका पाहिली आता वाघ्या कुत्र्याची काय भानगड आहे ती पाहुया वाघ्या कुणी बसवला आणी कुणाला बदनाम केले ?

Unknown said...

शिवराय यांच्या इतिहासात वाघ्या कुत्रे होते याचा कोणताही पुरावा प्रथम आणि दुय्यम साधना मध्ये उपलब्ध नाही मग हा वाघ्या कुत्रा कुठून आला ते पाहूया
वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख शिवराय च्या नंतर २५० वर्षांनी म्हणजे १९०५ मध्ये झाला ची.ग.गोगटे यांच्या महाराष्ट देशातील किल्ले या पुस्तकात तो उल्लेख आला आहे तो असा
"महाराजा चा अंत झाल्यावर त्याचे प्रेत पालखीत घालून दहन भूमीवर आणले, त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता. दहन विधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालवली आहे, असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत जाऊन एकदम महाराजा च्या चितेत उडी घातली व आपणास जाळून घेतले "
हा असा उल्लेख सर्व प्रथम १९०५ मध्ये झाला या ठिकाणी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शिवराय यांच्या सोबत कुत्रा चितेत गेला म्हणणे एक मोठी हारामखोरी आहे कारण एखाद्या मनुष्य सोबत त्या मनुष्य ची पत्नी सती जात असे शिवाजी महाराज यांची पत्नी पुतळाबाई या सती गेल्या आहेत . गोगटे ने अत्यंत काल्पनिक लिखाण करून कुत्र्या ची गोष्ट रचली
पण रायगड वरील एक महत्वपूर्ण पुस्तक 'राजधानी रायगड' हे पुस्तक १९२९ मध्ये लिहिले आहे त्या मध्ये वाघ्या कुत्र्या किंवा कुत्र्याच्या समाधी चा उल्लेख कुठेच आला नाही
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधीचा जीर्णोद्धार १९२७ मध्ये पूर्ण झाला होता शिवराय यांच्या समाधी चा जीर्णोद्धार करण्यास मदत करणाऱ्या मध्ये तुकोजी होळकर, सयाजीराजे गायकवाड ,छ.शाहू महाराज ,बर्डवान संस्थानाचे राजे ,इग्रज सरकार चे पुरातत्व खाते होते.
शिव समाधी चे काम पूर्ण झाल्या नंतर वाघ्या कुत्र्या चा पुतळा १० वर्षांनी रायगड वर छ.शिवराय यांच्या महाराणी च्या समाधी वर लावला आहे. येथे तुकोजी होळकर यांचा या वाघ्या प्रकरणात कुठेच संबध येत नाही. १९२७ साली शिव समाधी ज्या ठिकाणी बांधली त्याच्या जवळ एक दुर्लक्षित चबुतरा होता ती एक राज घराण्यातील व्यक्ती ची समाधी होती. त्याच समाधी वर काल्पनिक वाघ्या कुत्रा बांधण्यात आला
होळकर यांना बदनाम करणारी आणि वाघ्या चा जन्म कसा झाला याची जी आख्यायिका तयार केली ती आपण पाहुया
"स्मारक समितीतील काही मंडळी स्मारका साठी निधी जमवायला इंदूरला होळकरांकडे गेली होती होळकर संस्थानिक असल्यामुळे इंग्रजांना घाबरत होते. शिवरायांच्या स्मारकाला पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही याचीही त्यांना मनोमन खात्रीही होती. तेव्हा ही श्रुंगापती टाळावी म्हणून त्यानी प्रथमतः समितीच्या सभासदांची गाठ घेण्यास टाळाटाळ केली. कारण सांगितले की महाराज सुतकात आहेत. सुतक कसले तर महाराणीसाहेबा च्या लाडके कुत्रे गेले होते. त्याचे सुतक ! पण स्मारक समिती चे माणसे चाणाक्ष आणि चिकाटीची होती. आपली गरज आणि महाराजा ची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन त्यानी अफलातून तोडगा काढला. होळकर महाराजांनी आपल्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही. इंग्रज अवकृपे ची भीती नाही! तोडगा उपयोगी पडला होळकरांनी देणगी दिली "
ही आख्याविका ज्याने निर्माण केली त्याच्या मनात काय होते हे आता समजून येते ही आख्याविका कशी खोटी आहे ते पाहू
इंदूर च्या गादीवर तुकोजीराव होळकर हे बसलेले होते ते अत्यंत शिवप्रेमी होते. त्यानी राजेश्री शाहू महाराज यांनी पुण्यात पायाभरणी केलेल्या शिव स्मारकास मोठी मदत केली होती. तसेच केळूसकर गुरुजी नि लिहिलेले शिव चरित्र तुकोजी होळकर यांनी स्वत च्या पैस्यानी जगभरातील ग्रंथालयास मोफत वाटले. ते होळकर म्हणे इंग्रज सरकार च्या पुढाकाराने निर्माण होणाऱ्या शिवस्मारकाला देणगी देण्यास घाबरत होते .
इ.स.१८९६ मध्ये या शिवस्मारकास देणगी देण्यास तयार असणारे संस्थानिक बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज ,कोल्हापूरचे राजेश्री शाहू महाराज, तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आउसाहेबा च्या पाचाड येथील समाधी चा जीर्णोद्धारकरणारे फलटण चे निंबाळकर हे संस्थानिक घाबरत नव्हते फक्त होळकर घाबरत होते ?

Unknown said...

या कालावधीत म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या कालावधी मध्ये इंग्रजांनी शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्राच्या जनमानसा मध्ये असणारे स्थान ओळखून इंग्रजां नि वार्तापत्रा मध्ये शिवरायांचा मोठा फोटो छापून महाराष्ट्र मधील मराठ्याना 'तुम्ही शिवरायांचे वारसदार आहात म्हणून सैन्यात दाखल व्हा !' असे आव्हान केले जात होते . आणि जे इंग्रज शासन स्वत शिवरायांचा जयजयकार करत होते,आणि इंग्रजांनी स्वता पुढाकार घेऊन इ.स.१८८६,१९०६ आणि १९११ मध्ये शिव समाधी चा जीर्णोद्धार केला होता. ज्या इंग्रज युवराज प्रिन्स ऑफ चार्ल्सने स्वमुखाने शिवरायांबद्दल जगातील महान मुत्सद्दी,धुरंदर सेनापती,भारतातील पूज्यानीय विभूती आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक असे उदगार इ.स. १९२१ मध्ये काढले होते ; त्या इंग्रजां ना होळकर घाबरावे , हे तर्काच्या कोणत्या कसोटीस उतरते ?
वाघ्या कुत्रा ज्या ठिकाणी बसवला आहे त्या चबुतर्‍यावर जो शिलाफलक बसवण्यात आला आहे. त्या फलका वर बेवड्या गडकरी च्या राजसंन्यास नाटका मधील पुढील वाक्य कोरली आहेत
"थोरल्या छत्रपतीचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान खरोखरीच सर्वानी मान देण्या सारखे होते . हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे,अखेर, प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली.

Unknown said...


- राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकावरून "

हा मजकूर फलका वर लिहिण्या मागे चागल्या भावना मुळीच नाहीत .कारण राजसंन्यास हे नाटक संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज याना बदनाम करण्या साठी लिहिले होते त्या नाटका मधील जर कुत्रा खरा आहे तर त्यातील शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पण स्त्रीलंपट स्वराज्य मधील स्त्रिया वर अत्याचार करणारे असी लोकांची भावना होऊ शकते त्या साठीच राजसन्यास नाटका मधील संदर्भ घेऊन वाघ्या तिथे उभा केलाय
छ. शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज संन्यास नाटका मध्ये काय लिहिले आहे ते पाहूया
जिवाजी या पात्रा करवी शिवाजी महाराज यांच्या विषयी राम गणेश गडकरी यांने म्हटले आहे "अरे शिवाजी म्हणजे मुठ दाबल्या साडे तीन फुट उंचीचा त्याची काय मात्तबरी सांगतोस देहू..........म्हणे हिंदूपदपाच्छाइ उठवली ! काय रे मोगलाई मोडली आणि मराठशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटते ? शिवाजी च्या राज्यात लिंबोणी ला आंबे आले की बकरी ने आपली पोर वाघ्या च्या पोराला दिली? की कणसा मधून माणसे उपजली ? अरे केले काय शिवाजी ने असे ? मोघलाईत हुकमती केसाची टोळी दाडीखाली लोंबत होती ती मराठशाहीत कवठी वर चढली, तेव्हढाच लाभ! शिवाजी नशीबाचा म्हणून त्याचे नाव झाले इतकेच! त्यातून खर सांगू ?......शिवाजी ची लायकी चार चौघांना पुढे कळणार आहे ......त्या माणसात जीव नव्हता रे !
हे लिखाण आहे राज संन्यास नाटका मधील अत्यंत विकृत लिखाण राम गणेश गडकरी याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विषयी केले आहे या नाटकाला महत्व देण्या साठीच वाघ्या तिथे आणला आहे मी संभाजी महाराज यांच्या विषयी जे लिखाण राज संन्यास मध्ये केले आहे ते लिहण्याची साठी माझी पेन धजावणार नाही अत्यंत विकृत असे लिखाण संभाजी महाराज यांच्या विषयी केले आहे कोणताच शिवप्रेमी तो लिखाण वाचू शकणार नाही येव्हढे ते घाणेरडे आहे त्या राजसंन्यास मधील काल्पनिक कुत्रा वाघ्या घेऊन त्याचे स्मारक बनवणाऱ्या बामना च्या मनात काय डाव होता हे राजसंन्यास आणि जेम्स लेन प्रकरणा वरून समजून येते


होळकर यांना बदनाम करण्यासाठी जे बमानाचे दलाल काम करत आहेत ते आपणास माहीत आहेत त्यांचा उल्लेख करावा एव्हढी पण त्यांची लायकी नाही पण त्या दलालांना आमचे आव्हान आहे की तुमच्या कडे वाघ्या संबधी पुरावे असतील तर ते सादर करावेत


वाघ्या कुत्रा हा न.ची केळकर यांनी बसवला आहे आणि तो कुत्रा इंदूर येथून आणला नसून तो मुंबई मधून आणला आहे तो मुंबई येथील शिल्पकार करमकर यांच्या कडून आणला याचे पुरावे उपलब्ध आहेत पण होळकर यांना बदनाम करण्या साठी ही गोष्ट लपवली जातेय.
ज्या लोकांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक शिवरायांच्या महाराणी च्या समाधी वर बसवले त्या मध्ये कुणीही बहुजन नव्हते सर्वजन ब्राम्हण होते आणि त्यांचे नेतृत्व बहुजन लोकांना आरक्षण कशाला हवे म्हनुन लेख लिहून आत्यंतिक घाणेरड्या भाषेत वाणी कुणबी माळी धनगर इत्यादी जाती ची बदनामी करणारा केसरी चा संपादक न.ची. केळकर हा होता तसेच केळकर यांचा आमचे स्वराज्यद्रोही महाराज हा लेख छ.राजेश्री शाहू महाराज यांची बदनामी करण्या साठी लिहिला होता अत्यंत घाणेरडी भाषा वाफारून त्या मध्ये छ.राजेश्री शाहू महाराज यांच्या वर टीका केली होती त्या केळकर ने वाघ्या कुत्रा त्या ठिकाणी बसवला आहे
संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ यांची पूर्वी पासून भूमिका आहे की इतिहास चे पुनर्लेखन झाले पाहिजे सत्य इतिहास लोका समोर आला पाहिजे या साठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कार्यरत आहेत आणि कार्यरत राहील वाघ्या कुत्रा जो शिवाजी महाराज यांच्या महाराणी च्या समाधी वर लावला आहे तो काढून आपणास महाराणी च्या समाधी चा जीर्णोद्धार करायचा आहे आणि आपण करूच

संदर्भ
शिवछत्रपती च्या समाधी चा शोध आणि बोध -लेखक इतिहास संशोधक इंद्रजित सावंत
रायगड एक अभ्यास भाग १ आणि ३- लेखक गोपाल चांदुरकर
राजसंन्यास - लेखक राम गणेश गडकरी .


भैया पाटील
संभाजी ब्रिगेड आय.टी.सेल अध्यक्ष
9975623128
bhaiya.patil2@facebook.com

Unknown said...

Raje Shiv chhtrapati Shivaji maharaj ki Jay!! !!!! ! !!!!!!!!

किमंतु said...

वाघ्या:सत्य आणि असत्य भाग ०१

या भूतलावर कधीही जन्माला न येता देखिल अवतारपदाला पोहचून रायगडावर विराजमान झालेल्या वाघ्या कुत्र्याच्या अलौकिकत्वाचा आणि आपल्या सर्वांच्याच बौद्धिक दिवाळखोरीचा परखड व तर्कशुद्ध आढावा घेणाऱ्या मालिकेतील हा पहिला भाग.


https://youtu.be/NcHCaDPTmzY