संभाजी महाराजांबद्दल बखरी जे म्हणतात ते खरे मानले, तर मराठ्यांचा हा युवराज बलात्कारी होता. आपला पिता शिक्षा करील या भयाने दिलेरखानाकडे जाऊन त्याने स्वराज्याशी द्रोह केला होता. एवढेच नव्हे, तर इंग्रज पत्रावर भरोसा ठेवायचा, तर त्याने साक्षात् शिवछत्रपतींना विष दिले होते! पण यात ऎतिहासिक सत्याचा कणही नाही.
महाराजांवर तेव्हा (1675च्या अखेरीस) विषप्रयोग झालेलाच नव्हता. यावेळी त्यांचा मृत्यूही झालेला नव्हता! ते साता-यावर दीर्घ काळ आजारी होते इतकेच. त्यातही गंमत अशी की, खुद्द इंग्रजांनीच काही दिवसांनंतरच्या बातमीपत्रात (7 एप्रिल 1676) विषप्रयोगाचा कर्ता संभाजी नसून एक न्हावी असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्या पहिल्या बातमीपत्राचा सगळाच डोलारा कोसळला की! आणि शिवाजी महाराज संभाजी दिलेरखानाला मिळण्यापूर्वी त्याला हर बहाण्याने पकडून ठार मारण्याच्या प्रयत्नात होते, या कहाणीची तर विचारही करण्याचे काही कारण नाही.
मल्हार रामरावाची बखर, जी सांगते की संभाजीने राजवाड्यात एका महिलेवर बलात्कार केला, तिच्याकडे तर विशेष काळजीने पाहावे लागते. मुळात ही बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिली गेली आहे. त्यामुळे तिच्यात सांगोवांगी कहाण्या पुष्कळच असणार हे उघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही बखर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. त्याची कारणे मल्हार रामरावाच्या इतिहासात आहेत. बाळाजी आवजी चिटणीस हा मल्हार रामरावाचा खापर पणजोबा होता. त्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले होते. ही बखर लिहिताना मल्हार रामरावाच्या मनात संभाजीबद्दलचा हा राग नसेलच असे कसे म्हणता येईल? डॉ. जयसिगराव पवार सांगतात, बाळाजी आवजी, खंडो बल्लाळ या आपल्या पूर्वजांविषयी लिहिताना त्याने त्यांच्या प्रतिमा उजळून टाकल्या आहेत. तथापि संभाजी महाराज गादीवर येऊ नयेत म्हणून झालेल्या कटांत, किंवा त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या आणि अकबराशी संगनमत केल्याच्या कारस्थानांत बाळाजी आवजीचा काही भाग होता हे तो कोठेच नमूद करीत नाही.
अतिशय विकृत पद्धतीने या मल्हर रामरावाने संभाजी महाराजांची बदनामी केली. त्याने सांगितलेल्या कहाणीवर विसंबून पुढे अनेकांनी संभाजी राजांना काळ्याकुट्ट रंगात रंगविले. पण या बलात्काराच्या कथेत काहीच दम नाही! मल्हार रामरावाने सांगितलेली ही गोष्ट म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. डॉ. पवार सांगतात, "ज्या रायगडावर ही घटना घडली असे सांगण्यात येते, त्या गडावर संभाजीराजे यावेळी नव्हतेच. मल्हार रामराव सांगतो, की ही घटना घडल्यानंतर पित्याचा रोष ओढवून त्याची शिक्षा टाळण्यासाठी संभाजीराजे रायगडाहून दिलेरखानाच्या गोटात पळून गेले. प्रत्यक्षात ते सज्जनगडाहून खानाच्या गोटात गेले आणि त्यापूर्वी त्यांचा मुक्काम द. कोकणात शृंगारपुरी पावणेदोन वर्षे होता."
वास्तविक ऑक्टोबर 1676 पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आलेच नव्हते. तरीही मल्हार रामराव, इंग्रजी बातमीपत्र आणि बुसातिन-उस-सुलातिन ही तिन्ही साधने त्यांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगतात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो!
या 'बलात्कार कथे'ची नायिका गोदावरी ही आहे. तिला तर कोणताही ऎतिहासिक आधार नाही. पण मग तिची समाधी रायगडाच्या पायथ्याशी दाखविली जाते, ते कसे?
याचे उत्तर आहे - आज रायगडाच्या पायथ्याशी गोदावरीची जी समाधी दाखविली जाते, ती आहे सवाई माधवराव पेशव्यांची पत्नी यशोदाबाई हिची समाधी! (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 396-397)
संभाजीच्या आणखी दोन नायिका आपल्याकडील चित्रपट, नाटके आणि कादंब-यांनी रंगविल्या आहेत. त्यातील एक आहे तुळसा आणि दुसरी थोरातांची कमळा. या कमळाची समाधी पन्हाळ्याच्या परिसरात दाखविली जाते. पण तिचीही गत गोदावरीसारखीच आहे. ही समाधी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडातील यशवंतराव थोरात या शूर पुरुषाची आहे! बाळाजी विश्वनाथाच्या फौजेशी करवीरकरांच्या बाजूने लढत असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी यशवंतराव धारातीर्थी पडला. त्याची बायको त्याच्याबरोबर सती गेली. या दोघांची ही समाधी आहे. आता तेथे उभयतांच्या मूर्ती त्यांच्या वंशजांनी स्थापन केल्या आहेत. (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 306-309)
तुळसा हे पात्र तर तद्दन काल्पनिक. ते आत्माराम मोरेश्वर पाठारे या नाटककाराने 1891 साली आपल्या 'संगीत श्री छत्रपती संभाजी' या नाटकात निर्माण केले. या पात्राला लोककथेतही स्थान नाही.
संभाजी महाराजांच्या स्त्रीलंपटपणाच्या कथांची अशी वासलात लागल्यानंतर त्यांच्या चारित्र्यावर 'डाग' राहतो तो स्वराज्यद्रोहाचा.
शंभूराजे दिलेरखानाला का मिळाले, हा मोठा गहन प्रश्न आहे.
संदर्भ -
मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993
47 comments:
solid vat pahat hoto ya postchi.
संभाजीबद्दलचे जुने चित्र आज लोकांसमोर राहिलेले नाही. शिवपुत्र संभाजी हे डौ. कमल गोखले या़चे पुस्तक प्रसिध्द होऊनही खूप दिवस झाले. आता या शिळ्या कढीला एवढ्या अभिनिवेशाने ऊत आणण्यात काय हशील? मात्र डौ. पवारांच्या पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मिळवून वाचले पाहिजे. धन्यवाद.
खुप जुन्या व्यक्तिमत्वांबद्दल माहिती मिळाली.
संभाजी राज्यांबद्दलच्या समजुती कश्या चुकिच्या आहेत हे आता कुणाला सांगताना व्यवस्थित पुरावे देता येतील...
पुढिल पोस्टच्या प्रतिक्षेत...
पी. के. फडणीस,
संभाजीराजांबद्दलचे जुने चित्र आज लोकांसमोर राहिलेले नाही, हे कशावरून?
आपल्या नाटकारांनी आणि कादंबरीकारांनी संभाजीबद्दल काय काय लिहून ठेवलंय हे का तुम्हाला माहित नाही?
आणि विसोबा शिळ्या कढीला ऊत आणतायत असं तुम्हाला का बरे वाटावे? त्यांचा अभिनिवेश (हे काय प्रकरण आहे?)तुम्हाला कुठे बरं दिसला. उगा आपलं काही तरी...
ha visoba half chaddiwala ahe kay?
माझ्या टिप्पणीबद्दल विसोबा काय म्हणतात ते प्रथम पाहू. नाटके - कादंबर्या काहीहि म्हणोत ते महत्वाचे नाही. तो इतिहास नव्हे.
त्या विसोबाला कशाला त्रास देताय उगा? तो बसलाय अजून संभाजी दिलेरखानाला का मिळाला हे शोधत. आणि फडणीससाहेब, तुम्हाला उत्तरच हवं असेल, तर ते तुमचा आनंदने दिलंय की. ते वाचा.
विसोबा, तुम्ही संभाजीबद्दल अजून काही लिहिणार आहात की नाही? आम्ही त्याची उत्सुकतेने वाट पाहतोय. लिहिणार असाल, तर कधी? पुढची पोस्ट कधी येणार?
तुमच्या चड्डीबद्दल लोकांना प्रश्न पडायला लागलेत. त्याचं काही तरी करा. नाही तर जाऊ द्या. लोकांना नसत्या उचापतीच फार.
तुमचा,
विठोबा
श्री विश्वास पाटील यांच्या संभाजी कादांबरीच्या प्रस्तावनेत यातील बर्याच आरोप आणि कितालांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. संभाजी राजांना खल पुरूष म्हणून का रंगवले गेले याची उत्तरे तिथे मिळतात. नक्की वाचा..
jya godawari baddal bolale jat aahe tich mrutu ha karnalya killyawar zala hota tila sambhaji maharajyani chita dileli nahi kiwa ti sati geleli nahi ani tichi raigadachya paytyashi samdhi dekhil nahi
waril ullekh chawa (shivaji savant) ya madhe wachawa
शंभूराजे दिलेरखानाला का मिळाले, हा मोठा गहन प्रश्न आहे.
Shri Visoba,
ChatraPati Sambaji MAharaj Sadacharani va Stshil hote parakrami hote hyat shanka ch nahi pan he patavanya sathi aapan dilele purave purese nahit.
Purave shiv kalatil have! Jayasing rao pawar che pustak tya kalatil nahi
purave ajuni dya jene karun kona murkhane shanka hi geu naye
Jay Chtrapati sambhaji maharaj !
Pritam
khota bachav........
sbhaji mulech shivaji rajana yatna zalya......
Read This ..
http://raigad.wordpress.com/%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%9d%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87/%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0/
tudavie pahije aslya nalaykanna
Sambhaji raje tyancha charitra var ghanarde bot dakhavle aahe khartar te strila pavitracha mant ast aakbarchya bheti natar tyani aakbarala ek hire moty jadit kantha dila hota to tya aakbarane eka nartikela dila he samjalyavar sambhaji rajancha akrosha jhala mg tyanchavar ase aarop ka swarajacha dusra shatrapati aani tyanchi evdhi badnami ka???
satyachi mahiti milali aata jar koni vishay kadhala tar tyache tond bandh karun tyala satya kay aahe te patavun deil
Ekdam khoti post...pawar saheb thoda puravya Nishi lihila asat tar Bara zala asata...thodi mahiti ghya..kahi gairsamajatun balaji avjinbrbr ha apghat zala hota pn hi zaleli chuk maharani yesubainni maharajanna nidarshanas anun dili..va khando balla va nilo ballal hyana svatachya vadyat theun lahanache mothe kele..khando ballal asa vir hota, svatachya vadilanvr evadha anyay zala astaana sudha shevat paryant maharajan sobat ekanishth rahila. Dusara mudda shahu maharajanni swatah hi bakhar malhar ramravas lihinyacha adesh dila hota.jar hya likhanaat kahi chukiche ahe ase tyanna vatale asate tr hya bakhariche va malhar ramravanche astitv rahilech nasate..va tyanatr peshwai suru hotana svatah maharajanni peshwyanna lihilele letter vacha..te ase Ki peshvyanni svarajyacha karbhar balaji avajinche vanshaj chitnis hyanchya sallyane karava... Evdhe sarv purave samor astaana keval prasiddhi sathi asli kaame karu Naka..
हाहाह मस्त टपलीत! विसोबा lol
छत्रपती संभाजी महाराज हे एक शूर, वीर, हुशार लढवय्ये होते पण आपल्या महाराष्ट्रातील काही नालायक मूर्ख, स्वार्थी लॊकांनी त्यांचा इतिहास खूप तुच्छतेने लिहला जसेकाय त्यांना संभाजी महाराजांचा बदलाचं घ्यायचा होता . आम्हाला पण संभाजी महाराजांचा विकृत इतिहास शिकवलं गेला. पण मनाला ते पटत नव्हतं, नालायक नाटककारांनी तर अशी नाटके रंगवली जशी त्याच्या आई बहिणी वरच अत्याचार केला. असो आमचे राजे हे शूर, वीर, तर होतेच पण विद्वान आणि गरिबांना समजून घेणारे होते त्यामुळे आम्हाला त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजा इतकाच अभिमान आहे ...
अजिंक्य चिटणीस 😅😅😅
अहो तुमच्या नावातच सगळं काही आलं
Sambhaji maharajani budhbudhan jya padhatin lihala ahe to hi vayachya 14 varshi, yevadya chotyashya vayat yevade Thor vichar asanare Raje kadhich chuku shaknar nahit....Lokana arop distat...Pan tyani kelelta 120 ladhaya disat nahit...9 varsh kelela hatyahas disat nahi..
पटलं आपलं म्हणणं
संभाजी राजे दिलेरखान ला का मिळाले याचे कारण त्यांच्या घरातील वाद विवाद आहे, त्याच्या सावत्र आई सोयराबाई व त्यांचे अनुयायी यांचे मत होते राजाराम ला गादीवर बसवणे, तसेच त्यांनी राजेंच्या जेवणात विषप्रयोगही केला होता व परिवारात त्यांना कायम विरोध असायचा, आशा परिस्थितीत राजे एकटे पडले म्हणून ते दिलेरखाना सोबत मिळाले..
jai shivaray
he je kahi murkh kathakar ahet tyana mulat kahi mahit nasatan kahi rangavat gele tya charitr sampan sambhaji rajyan var ase natak kadambarij sensor border ne band karayala havet
Aplyala kahi mahiti naslyas Shanta rahave ugachach aplya ganarda taond ugadu Naya tyacha parinam vait hotil
Ti shivrayachi chal hoti
मला पण राजे संभाजी राजांचा अभिमानच वाटतो असे राजे पुन्हा जन्माला यावोत अशी माझी इच्छा आहे .
राजे संभाजींना मानाचा मुजरा संभाजी महाराज की जय
शाहू महाराजांनी बखर लिहायला सांगितली हे म्हणणे मूर्खपणाचे आहे.ही बखर शंभूराजेंच्या मृत्यू नंतर १२२ वर्षानी लिहिलेली आहे.शाहू महाराज ईतके दिवस जिवंत होते का??ऊगाच महाराजांची बदनामी करू नका
शंभूराजेंच्या विरोधातील comments वाचून असं वाटतय की आणाजी दत्तो चे वंशज आहेत हे लोक.
शंभूराजेंच्या विरोधातील comments वाचून असं वाटतय की आणाजी दत्तो चे वंशज आहेत हे लोक.
शाहू महाराजांनी बखर लिहायला सांगितली हे म्हणणे मूर्खपणाचे आहे.ही बखर शंभूराजेंच्या मृत्यू नंतर १२२ वर्षानी लिहिलेली आहे.शाहू महाराज ईतके दिवस जिवंत होते का??ऊगाच महाराजांची बदनामी करू नका
बामनाच्या पिलावळी तु मादरचोदच आहेस
आरे मादरचोद बामना थोडी तरी बुद्धी आहे का तुला संभाजी महाराजांच्या मृत्यू च्या 122 वर्षांनंतर ही बखर लिहिली आणि शाहु महाराज मृत्यू 1749 म्हणजे 60 वर्षानंतर झालता
दोष तुझा नाही रे तुझ्या रक्तात असलेल्या गद्दार ब्राम्हणीपणाचा दोष आहे
आरे हरामखोर तुझा इतिहास तुझ्या घरापाशी ठेव आम्हाला स्वतः शिवरायांनी लिहिलेल्या पत्रात नमुद केलेल आहे की संभाजी महाराजांना दिलेरखानाकडे पाठवणे हा गणिमी कावा आहे म्हणून
We have great respect and reverence for our Sambhaji Maharaj. Now Marathas are aware of their glorious history. Sambhaji Maharaj's character was above suspicion and excellent and his contribution to self rule (Swarajya) was tremendous. I salute to such a great king of Marathas.
Kaka..ethe jatiyvadi tippani karu naye...
हे 'फडणिस'असल्याचे लक्षण. सुधरा रे । आतातरी.
Unknown, चिटणीस हे प्रभू जातींचे, आपले knowledge वाढवा. उगाच शौका साठी बामणाला शिव्या कशासाठी देताय.
ते नाटक,पुस्तक प्रदर्शित होऊ देऊ नये.महाराजांचा चुकीचा इतिहास,त्यांना बदनाम करण्याचा कट हाणून पडावा.
फक्त संभाजी म्हणताय.ते तुमच्या येवढे आहेत का तुमच्या मित्रा येवढे? अदबीने नाव घ्यावे त्यांचे ते होते म्हणून राष्ट्र आहे आणि तुमच्या आमच्या सारखे सुद्धा.
खल पुरुष/नपुसंक कोण होते या साठी इतिहास साक्षीला आहे.खोटं काही कामाचा नाही.नाटककार काही संशोधन करून नाटक लिहीत नाहीत.त्यांचे काम नाटकात नायचे असते इतिहास लिहायचे नसते.
नाटककार काही संशोधक नसतो .त्याला मनावर घेऊ नये व त्याने जे लिहिलय ते प्रदर्शित होऊ देऊ नये.हा पद्धतशीर कट आहे गौरव शाली इतिहास मिटविण्याचा. गद्दार माणसाला हत्तीच्या पायी दिल्याचा सूड उगवत आहेत.जे भृष्ट होते त्यांना शिक्षा महाराजांनी केली.खरं इतिहास आपण लिहा.गद्दार जो इतिहास लिहितील तो पुसून टाका.
चुकीचा इतिहास लिहितात त्यांना धडा का शिकवायला जात नाही.काहीतरी इतिहास लिहायचा आणि थोर महाराजांना बदनाम करायचे येवढे छोटे व्यक्ती न्हवते ते.ज्या नाटक काराने चुकीचा इतिहास त्याने काय संशोधन केले ते पाहावे आणि काहीच संशोधन न करता जर इतिहास लिहिला असेल त्याला धडा शिकवावा.हे काहीही इतिहास लिहितील आणि बदनामी करतील येवढे सोप्पे होऊ देऊ नये.आपण नपुंसक नाही हे ही लक्षात घ्या.
गद्दार रक्तात आहे.हत्तीच्या पायी दिल्याचा राग आहे.कट करण्यात बहाद्दर असतात ही मंडळी.यांच्या घाऱ्या आणि निळ्या डोळ्यांचा इतिहास लिहा जरा कोणीतरी.
Post a Comment