मस्तानीची बदनामी : एक माजघरी कारस्थान!


बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाणे हे इतिहासाला धरून नसल्याने त्याविरोधात गेल्या महिन्यात (नोव्हेंबर-डिसेंबर २०१५) संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांचे म्हणणे एकच होते, की इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही, करता कामा नये. ही एक चांगलीच गोष्ट झाली. इतिहासाशी वृथा खेळ नको असा आग्रह धरला जाणे ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. असा आग्रह धरल्यामुळे आणखी एक झाले. ते फारसे कुणाच्या लक्षात आलेले दिसत नाही, पण पुराव्यांनिशी इतिहास जे सांगतो ते आणि तेवढेच मान्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या अंगावर आली.

निमित्त मस्तानी




मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. हा राजा हिंदू. त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनौरसही नाही. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. हा पंथ सेक्युलर विचारांचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानची मोठी झालेली आहे. त्यामुळेच ती नमाजही पढते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतिण वा वारयोषिता नाही. पण पिंगा गाण्यावर आक्षेप घेणारांना फक्त काशीबाईची प्रतिष्ठा तेवढी दिसते आणि मस्तानीबाबत शब्दही काढावा वाटत नाही, याचे कारण आजवरच्या कथाकादंब-या आणि बखरींनी बनविलेली तिची प्रतिमा.

लोकप्रभाच्या २७ नोव्हेंबर २०१५च्या अंकातील 
टाचणी आणि टोचणी या रवि आमले यांच्या सदरातील लेख.

मद्यपुराण (प्रशस्ती ते बंदी)

वैदिक धर्मशास्त्रामध्ये मद्यपान निषिद्ध मानण्यात आले आहे. मनुने तर मद्य जाणताच काय, पण अजाणतासुद्धा पिऊ नये अशी आज्ञा दिली आहे.
धार्मिक हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि पूज्य असलेल्या अशा मनुस्मृतीमधील ही आज्ञा आहे. तेव्हा तिचे महत्त्व लक्षात यावे. हा ग्रंथ स्थूलमानाने इ.स. २०० ते ३०० या काळातला आहे. मौर्य सम्राट ब्रहद्रथ मौर्य याचा त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने खून केला आणि स्वत:ला सम्राट म्हणून घोषित केले. त्याच्या काळात वैदिक धर्माला खूप चांगले दिवस आले. मनुस्मृती ही त्या शुंगकाळातली. हिंदूंचे धर्म कायदे त्यात सांगितले असल्याने तो अतिशय महत्त्वाचा ठरतो, तर या ग्रंथाने दारू पिणे हे पाप असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मते-
सुरा वै मलमन्नानां पाप्मा च मलमुच्यते
तस्माद् ब्रा’राजन्यौ वैशच्य न सुरां पिबेत्
(मनु. ११.९३)

दारू म्हणजे अन्नाचा मळ. आणि मळास पाप म्हणतात. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी दारू पिऊ नये. शूद्रांबाबत येथे मनू काही सांगत नाही. त्यांचे मद्यसेवन त्याने दुर्लक्षिले आहे. ब्राह्मणांना मात्र तो सूट देण्यास तयार नाही. कारण ज्या ब्राह्मणाच्या देहातील वेदज्ञान एकदासुद्धा दारूत बुडते त्याला शूद्रत्व प्राप्त होते (मनु. ११.९७), असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्राह्मणाने दारू जाणूनबुजून तर पिऊच नये, पण अज्ञानाने प्यायली तरी त्याला मनुने कडक प्रायश्चित्त सांगितले आहे. 

सत्यनारायणाची कथा


गेली साधारणतः दोन-अडीचशे वर्षे अत्यंत लोकप्रिय असलेली ही पूजा त्याआधीच्या धार्मिक जीवनाचा भाग नव्हती. ही पूजा शिवकालात नव्हती. छत्रपतींच्या कारकिर्दीत अनेक - विवाहसमारंभापासून किल्ले उभारणीपर्यंत – मंगलकार्ये झाली. परंतु शिवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण घातल्याचे उल्लेख नाहीत. अगदी पेशवाईतसुद्धा ही पूजा घातली जात नव्हती. या देवतेचा उल्लेख हिंदूंच्या अन्य कोणत्याही प्राचीन धार्मिक ग्रंथात नाही. तेव्हा प्रश्न असा येतो की या देवतेस कोणी जन्मास घातले? सत्यनारायणाची कथा मुळात आली कोठून?
तर त्याचे उत्तर आहे – बंगालमधून. तेथील एका मुस्लिम पीराच्या कथेमधून. तिचे नाव – सत्यपीरेर कथा...

लोकप्रभाच्या २२ मे २०१५च्या अंकातील टाचणी आणि टोचणी या रवि आमले यांच्या सदरातील लेख... लोकसत्ताच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध झालेल्या या लेखावरील तीव्र प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

खंडोबाची कथा - मूळ लेख

खंडोबाची मूळकथा या प्रा. विश्वनाथ शिंदे यांच्या लेखाची लिंक खट्टामिठावर दिली होती. परंतु ई-सकाळची ती लिंक सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे हा लेख मुळातूनच या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे. जिज्ञासूंनी तो जरूर वाचावा. त्यासाठी येथे क्लिक करा -

गोपुराण...


ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील २८ वे सूक्त इंद्राला उद्देशून आहे. त्यात म्हटले आहे, की हे इंद्रा, अन्नाच्या इच्छेने तुझ्यासाठी जेव्हा हवन केले जाते, त्यावेळी यजमान तातडीने दगडाच्या तुकड्यावर सोमरस तयार करतात. तो तू पितोस. यजमान बैल शिजवतात आणि तो तू खातोस. (अद्रिणा ते मन्दिन इन्द्र तुयान्त्सुन्वन्ति सोमान्पिबसि त्वमेषाम । पचन्ति ते वृषभाँ अत्सी तेषां पृक्षेण यन्मधवनहूयमान : | - ऋग्वेद १०.२८.३ ) या इंद्राला बहुधा बीफ अतिशय प्रिय असावे. याच मंडलातील ८६व्या सूक्तातील एका ऋचेत इंद्राचे उद्गार आले आहेत. तो म्हणतो – इंद्राणीद्वारा प्रेरीत यज्ञकर्ते माझ्यासाठी पंधरा बैल शिजवतात. मी त्यांचे मांस खातो आणि त्याने माझे पोट भरते. ते माझे पोट सोमरसानेही भरतात. (उक्षणों ही में पंचदंश साकं पंचंती: विश्तिम् | उताहंमदिंम् पीव इदुभा कुक्षी प्रणन्ती में विश्व्स्मान्दिन्द्र |)

सध्या गोमाता भलतीच चर्चेत आहे. राज्यात गोवंशहत्याबंदी कायदा लागू झाला आहे. तो देशातही लागू करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर गोहत्येबाबतची ही प्राचीन ग्रंथांतील माहिती उद्बोधक ठरेल...
लोकप्रभाच्या ३ एप्रिल २०१५ च्या अंकातील रवि आमले यांचा टाचणी आणि टोचणी या सदरातील लेख...