शिमगा : इतिहासाच्या पानांतून...

रंगोत्सव, १८५५
एका संवत्सराचा अंत आणि दुस-याचा आरंभ समारंभपूर्वक साजरा करण्याचा सण म्हणजे होळी. हाच शिमग्याचा सण. सीमग या शब्दापासून सीमगा आणि त्यापासून शिमगा असा हा शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ सीमग म्हणजेच सीमेप्रत आलेल्या सूर्याचा सण
हे नीट समजून घेतले पाहिजे. वेदांमध्ये वर्षारंभ वसंतापासून सुरु होतो. वर्षारंभ उत्तरायणाच्या आरंभी करावा असे धर्मशास्त्रांत सांगितले आहे. हल्ली उत्तरायण पौषात सुरू होते. पण सुमारे सहा हजार वर्षआंपूर्वी उत्तरायण फाल्गुनी पौर्णिमेस होत असे. या पौर्णिमैस सूर्य नक्षत्रचक्रांत दक्षिण दिशेच्या सीमेवर जाऊन उलटतो म्हणून तो सीमग म्हणजेच सीमेपाशी आलेला दिसला. एकंदर होळी म्हणजे फाल्गुनोत्सवच. हा सण चालतो पंचमीपर्यंत. म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला होळी असते. वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी केली जाते आणि वद्य पंचमीला रंगोत्सव
या होळीबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. होलिका ही लहान मुलांना खाणारी राक्षसीण. तिला गावक-यांनी जाळून मारले, याचे प्रतिक म्हणून होळी असे सांगितले जाते. महाराष्ट्रात हा सण तर दिवाळीपेक्षाही जुना असल्याचे सांगितले जाते. नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोक कर्नाटक आणि आंध्र प्रांतातून महाराष्ट्रात आले होते. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात त्यांच्या वसाहती होत्या. हे सारे गोपालक. गुरांचे मोठमोठे कळप असायचे त्यांच्याकडे. त्या गुरांचे शेण एकत्र साठविले जायचे आणि ते वर्षातून एकदा जाळायचे अशी प्रथा या लोकांनी सुरू केली होती. याच प्रघातातून होळीच्या सणाची सुरुवात आपल्याकडे झाली असे विद्वानांचे मत आहे
हा सण तसा देशव्यापी. पण प्रांतानुसार त्याच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आज आपण जी रंगांची होळी साजरी करतो, ती काही मूळ महाराष्ट्राची नाही. ती आपल्याकडे आली उत्तरेतून. त्याची काही कारणे आहेत इतिहासात आणि काही आहेत हिंदी चित्रपटांत. आपल्याकडे खरे महत्त्व असते ते होळी पेटविणे आणि धुळवड यांना
पूर्वी कसा साजरा केला जायचा हा सण? याचे उत्तर आपल्याला मिळते प्राचीन ग्रंथांतून

नेताजी फाईल्स

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्युच्या रहस्याविषयीचे लेख असलेला ब्लॉग - 





 


तुका लोकी निराळा

संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला 
यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.
तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून वेध घेणारी ही लेखमाला.

खट्टामिठाच्या वाचकांसाठी तिचे खास पान... 

(लोकसत्ताचे चित्रकार नीलेश जाधव यांच्या खास चित्रांसह)



तुलसी आंबिले यांचा पत्ता - tulsi.ambile@gmail.com
लोकसत्तातील सदराचा पत्ता - http://www.loksatta.com/lokrang-category/tuka-loki-nirala/

मस्तानीची बदनामी : एक माजघरी कारस्थान!


बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाणे हे इतिहासाला धरून नसल्याने त्याविरोधात गेल्या महिन्यात (नोव्हेंबर-डिसेंबर २०१५) संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांचे म्हणणे एकच होते, की इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही, करता कामा नये. ही एक चांगलीच गोष्ट झाली. इतिहासाशी वृथा खेळ नको असा आग्रह धरला जाणे ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. असा आग्रह धरल्यामुळे आणखी एक झाले. ते फारसे कुणाच्या लक्षात आलेले दिसत नाही, पण पुराव्यांनिशी इतिहास जे सांगतो ते आणि तेवढेच मान्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या अंगावर आली.

निमित्त मस्तानी




मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. हा राजा हिंदू. त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनौरसही नाही. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. हा पंथ सेक्युलर विचारांचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानची मोठी झालेली आहे. त्यामुळेच ती नमाजही पढते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतिण वा वारयोषिता नाही. पण पिंगा गाण्यावर आक्षेप घेणारांना फक्त काशीबाईची प्रतिष्ठा तेवढी दिसते आणि मस्तानीबाबत शब्दही काढावा वाटत नाही, याचे कारण आजवरच्या कथाकादंब-या आणि बखरींनी बनविलेली तिची प्रतिमा.

लोकप्रभाच्या २७ नोव्हेंबर २०१५च्या अंकातील 
टाचणी आणि टोचणी या रवि आमले यांच्या सदरातील लेख.

मद्यपुराण (प्रशस्ती ते बंदी)

वैदिक धर्मशास्त्रामध्ये मद्यपान निषिद्ध मानण्यात आले आहे. मनुने तर मद्य जाणताच काय, पण अजाणतासुद्धा पिऊ नये अशी आज्ञा दिली आहे.
धार्मिक हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि पूज्य असलेल्या अशा मनुस्मृतीमधील ही आज्ञा आहे. तेव्हा तिचे महत्त्व लक्षात यावे. हा ग्रंथ स्थूलमानाने इ.स. २०० ते ३०० या काळातला आहे. मौर्य सम्राट ब्रहद्रथ मौर्य याचा त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने खून केला आणि स्वत:ला सम्राट म्हणून घोषित केले. त्याच्या काळात वैदिक धर्माला खूप चांगले दिवस आले. मनुस्मृती ही त्या शुंगकाळातली. हिंदूंचे धर्म कायदे त्यात सांगितले असल्याने तो अतिशय महत्त्वाचा ठरतो, तर या ग्रंथाने दारू पिणे हे पाप असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मते-
सुरा वै मलमन्नानां पाप्मा च मलमुच्यते
तस्माद् ब्रा’राजन्यौ वैशच्य न सुरां पिबेत्
(मनु. ११.९३)

दारू म्हणजे अन्नाचा मळ. आणि मळास पाप म्हणतात. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी दारू पिऊ नये. शूद्रांबाबत येथे मनू काही सांगत नाही. त्यांचे मद्यसेवन त्याने दुर्लक्षिले आहे. ब्राह्मणांना मात्र तो सूट देण्यास तयार नाही. कारण ज्या ब्राह्मणाच्या देहातील वेदज्ञान एकदासुद्धा दारूत बुडते त्याला शूद्रत्व प्राप्त होते (मनु. ११.९७), असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्राह्मणाने दारू जाणूनबुजून तर पिऊच नये, पण अज्ञानाने प्यायली तरी त्याला मनुने कडक प्रायश्चित्त सांगितले आहे. 

सत्यनारायणाची कथा


गेली साधारणतः दोन-अडीचशे वर्षे अत्यंत लोकप्रिय असलेली ही पूजा त्याआधीच्या धार्मिक जीवनाचा भाग नव्हती. ही पूजा शिवकालात नव्हती. छत्रपतींच्या कारकिर्दीत अनेक - विवाहसमारंभापासून किल्ले उभारणीपर्यंत – मंगलकार्ये झाली. परंतु शिवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण घातल्याचे उल्लेख नाहीत. अगदी पेशवाईतसुद्धा ही पूजा घातली जात नव्हती. या देवतेचा उल्लेख हिंदूंच्या अन्य कोणत्याही प्राचीन धार्मिक ग्रंथात नाही. तेव्हा प्रश्न असा येतो की या देवतेस कोणी जन्मास घातले? सत्यनारायणाची कथा मुळात आली कोठून?
तर त्याचे उत्तर आहे – बंगालमधून. तेथील एका मुस्लिम पीराच्या कथेमधून. तिचे नाव – सत्यपीरेर कथा...

लोकप्रभाच्या २२ मे २०१५च्या अंकातील टाचणी आणि टोचणी या रवि आमले यांच्या सदरातील लेख... लोकसत्ताच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध झालेल्या या लेखावरील तीव्र प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.